शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

सांगली जिल्ह्यातील बदल्यांमध्ये समानीकरणाचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:30 IST

जिल्ह्यातील २१६५ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करताना सर्व तालुक्यात समान रिक्त पदे ठेवण्यासह अतिरिक्त शिक्षकांच्या शाळेचाही विचार केला गेलेला नाही

ठळक मुद्देअतिरिक्त ७४४ पदांवरही शिक्षक नियुक्ती :‘ग्रामविकास’च्या गोंधळामुळे शिक्षण विभागही बुचकळ्यात

सांगली : जिल्ह्यातील २१६५ शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करताना सर्व तालुक्यात समान रिक्त पदे ठेवण्यासह अतिरिक्त शिक्षकांच्या शाळेचाही विचार केला गेलेला नाही. ग्रामविकास विभागाने केलेल्या या बदल्यांमुळे समानीकरणाच्या ७४४ रिक्त पदांचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे शिक्षक आणि शिक्षण विभागाचे अधिकारीही मंगळवारी गोंधळून गेले. जत, आटपाडी, खानापूर तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा निर्माण होणार आहे.

जिल्ह्यात १६९८ प्राथमिक शाळा असून ६४३१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यापैकी ५८०६ शिक्षक कार्यरत आहेत. ७६० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. एकूण रिक्त जागांपैकी सर्वाधिक ३५० शिक्षकांच्या जागा जत तालुक्यात रिक्त आहेत. आटपाडी, खानापूर तालुक्यातही रिक्त शिक्षकांच्या पदांची संख्या जास्त आहे. दुर्गम, दुष्काळी तालुक्यातील शिक्षकांची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत असल्यामुळे सर्व तालुक्यांत समान पदे रिक्त ठेवण्याचा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला होता.

त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषदेकडून सर्व तालुक्यांत समान जागा रिक्त ठेवण्यासाठीच्या शाळांची नावे मागविली होती. त्यानुसार सर्वच जिल्हा परिषदांनी ती यादी ग्रामविकास विभागाच्या आॅनलाईन कक्षाकडे दिली होती. त्यानुसार जिल्हा परिषदांच्या बदल्यांमुळे समानीकरणातील रिक्त ठेवण्यात येणाऱ्या शाळा ब्लॉक झाल्या होत्या. तेथील जिल्हा परिषदांच्या बदल्यांमध्ये फारसा गोंधळ निर्माण झाला नाही.

सांगली जिल्हा परिषदेकडील बदल्यांमध्ये मात्र संवर्ग एक ते चारच्या सर्व बदल्या एकाचवेळी करण्यात आल्या. या आॅनलाईन बदल्या करताना दहा तालुक्यात समानीकरणाने ६४३ शाळांतील ७४४ शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक होते. या शाळांतील पदे ब्लॉक होणे अपेक्षित होते. या शाळा प्रत्यक्षात ब्लॉक झाल्याच नाहीत. यामुळे सर्व तालुक्यात शिक्षकांची समान पदे रिक्त ठेवण्याचा फज्जा उडाला. रिक्त ठेवायच्या शाळेतही ग्रामविकास विभागाकडून शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, मिरज तालुक्यातील काही शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले असून तेथेही बदलीने शिक्षक नियुक्त केले आहेत. तेथे नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांमुळे अतिरिक्त शिक्षक जाणार असून, उर्वरित दुसºया शिक्षकाचीही तेथून बदली होणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या या सावळ्या गोंधळामुळे शिक्षकांसह जिल्हा परिषद प्रशासनाचीही पंचाईत झाली आहे. मंगळवारी शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांची भेट घेऊन बदल्यांच्या गोंधळाबाबत विचारणा केली. वाघमोडेही गोंधळाबद्दल शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत.

जत तालुक्यात समानीकरणामुळे १७८ पदे रिक्त असण्याची गरज होती. परंतु, सध्या २४१ पदे रिक्त आहेत. आटपाडी, खानापूर तालुक्यातही तशीच परिस्थिती आहे. उर्वरित तालुक्यात मात्र समानीकरणाने सक्तीने रिक्त ठेवायच्या पदांपेक्षाही कमी रिक्त पदे आहेत. यामुळे येथील शिक्षकांना सक्तीने विस्थापित व्हावे लागणार होते. पण, आॅनलाईन प्रक्रियेत सक्तीने रिक्त ठेवायच्या शाळा ब्लॉक न झाल्यामुळे तेथे शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.ज्येष्ठांची गैरसोयजत, आटपाडी, खानापूर या दुष्काळी भागामध्ये दहा ते पंधरा वर्षे सेवा करुन काही ज्येष्ठ शिक्षक तालुक्यात नियुक्त झाले आहेत. कनिष्ठ शिक्षकांची सोय करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षकांच्या शाळेत त्यांची नियुक्ती केली आहे. कनिष्ठांच्या ‘खो’मुळे ज्येष्ठ शिक्षकांवर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ आली आहे. काही शिक्षकांनी बदलीची मागणी करुनही त्यांना सोयीच्या शाळा दिल्या नाहीत.शिक्षकांची रिक्त पदेतालुका सध्या समानीकरणानेरिक्त रिक्त ठेवण्याचीपदेआटपाडी ८८ ६०जत २४१ १७८क़महांकाळ ४१ ५४खानापूर ५९ ४४मिरज ९४ ११७पलूस १४ ३२शिराळा ३४ ४५तासगाव ७९ ८३वाळवा ६० ९३कडेगाव ५० ३८एकूण ७६० ७४४

 

सर्व तालुक्यात समान शिक्षकांची पदे रिक्त ठेवायची होती, तर ती ब्लॉक का केली नाहीत? प्रशासनाच्या गोंधळामुळे अनेक शिक्षकांच्या बदल्यांचा गोंधळ निर्माण झाला आहे. अतिरिक्त ठरलेल्या शाळेतही शिक्षक दिले आहेत. अनेक ज्येष्ठ शिक्षकांना कारण नसताना विस्थापित व्हावे लागत आहे. हे चुकीचे असून यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.- बाबासाहेब लाड,जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती